छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निघोज ग्रामस्थ व ग्रामपंचायत वतीने साजरी

0

पारनेर प्रतिनिधी सागर आतकर/ महाराष्ट्र दर्शन न्यूज :

निघोज: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निघोज ग्रामस्थ व ग्रामपंचायत वतीने साजरी करण्यात आली. यावेळी जी एस महानगर बॅंकेचे संचालक बबनशेठ लंके व मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कोषाध्यक्ष ज्ञानूशेठ लंके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, सरपंच चित्राताई वराळ पाटील, उपसरपंच माऊली वरखडे, ग्रामसेवक दत्तात्रय वाळके, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचे अनुकरण करीत आजच्या युवकांनी देशासाठी योगदान देण्याचे आवाहन निघोजच्या सरपंच चित्राताई वराळ पाटील यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निघोज ग्रामस्थ व ग्रामपंचायत वतीने साजरी करण्यात आली. यावेळी जी एस महानगर बॅंकेचे संचालक बबनशेठ लंके व मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कोषाध्यक्ष ज्ञानूशेठ लंके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, सरपंच चित्राताई वराळ पाटील, उपसरपंच माऊली वरखडे, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त शिवाजीराव वराळ, ज्येष्ठ नेते भास्करराव वराळ पाटील, रमेश लंके, शंकर पाटील वरखडे, गजानन ठुबे, रंगनाथ ढवण, निलेश घोडे, रावसाहेब वराळ, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, स्वप्नील आतकर, चंद्रकांत ढवण, नवनाथ ढवण, ग्रामपंचायत सदस्य मंगेश वराळ, सहाय्यक कामगार तलाठी सुनिल उचाळे, अशोक वरखडे, ज्येष्ठ ग्रामस्थ सदाशिव वराळ, ग्रामसेवक दत्तात्रय वाळके, अरिफभाई शेख, दत्तात्रय रसाळ तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

छत्रपतींनी आपल्याला हिंदवी स्वराज्य दिले. या स्वराज्यामुळे देशातील लोकांना लढण्याची प्रेरणा मिळाली म्हणून भारत देश लवकर स्वातंत्र्य झाला. आजच्या युवकांनी देशविकासासाठी योगदान देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.- सरपंच चित्राताई वराळ

छत्रपती शिवाजी महाराज यांनी इतिहास निर्माण केला. म्हणून आपण आज जिवणाचा खरा आनंद घेत असून हा इतिहास शेकडो पिढ्यांना प्रेरणादायी याआहे.- उपसरपंच माउली वरखडे

अस्लमभाई इनामदार यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेवटी पारनेर तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शक  दत्ता उनवणे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top