पारनेर : कोरोना विषानूच्या साथीमुळे सर्व शाळा महाविद्यालये बंद आहेत.अशा परिस्थितीत ऑनलाईन अभ्यास घेतले जात आहेत.परंतु कुठे तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. नुकतीच केंद्रीय मनुष्यबळमंत्री रमेश पोखरीयल यांनी देशातील सर्व शाळा, महाविद्यालये १५ ऑगस्ट नंतरच सुरू होतील अशी घोषणा केली आहे. परंतु कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव पाहता पालकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.त्यामुळे शाळा सुरू झाल्यावर मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार की नाही व शाळांमध्ये किती हजेरी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शाळा सुरू झाल्यावर मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याबाबत चिंतेत...
जून १०, २०२०
0
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद