लातुर : आस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली असताना. प्रशासनाची बदलती धोरणं यामुळे शेतकऱ्यांच्या चितेंत भर पडलीय. पावसाने नुकसान होताच वेध लागले आहेत ते नुकसान भरपाईचे नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांना नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र,ऑनलाईन की ऑफलाईन ही नवी अडचण समोर आली आहे. आतापर्यंत केवळ ऑनलाईन तक्रार नोंदवण्याचे सांगितले जात होते पण आता ऑफलाईनचाही पर्याय खुला असल्याचे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यानंतरही शेतकऱ्यांच्या मनातील घालमेल कायम आहे. नुकसानभरपाई मिळवण्यासाठी नेमके काय करावे हे अद्यापही (Farmer Confused) शेतकऱ्यांना उमगलेले नाही. पावसाने खरिपातील सर्वच पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानभरपईसाठी ऑनलाईन तक्रार करण्याचा घाट प्रशासनाने घातला होता. आता पुन्हा या नियमात बदल करुन शेतकऱ्यांना ऑफलाईनही तक्रार नोंदवता येत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता तालुक्याच्या ठिकाणच्या विमा कंपनीच्या बाहेर शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. (Crop Insurance) पिक नुकसानीबद्दलचा अहवाल हा विमा कंपनीकडे सादर करुन पुढील प्रक्रिया होणार आहे.
प्रशासनाच्या निर्णयात बदल
पिकाच्या नुकसानीसंदर्भात ‘क्रॅप इंन्शुरन्स’ या अॅपवर शेतकऱ्यांनी माहिती भरणे आवश्यक आहे. मात्र, ही किचकट प्रक्रिया शेतकऱ्यांना अडचणीची होऊ लागल्याने यामध्ये बदल करण्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांकडे अत्याधुनिक मोबाईल नाहीत तर ज्यांच्याकडे आहेत त्यांना सर्व माहिती भरणे अशक्य असल्याने हा निणर्य घेण्यात आला आहे.
तक्रार नोंदविण्यास वाढीव मुदत देण्याची मागणी
नुकसान झाल्यानंतर केवळ 72 तासाच्या आतमध्ये शेतकऱ्यांना तक्रार नोंदवावी लागत आहे. मात्र, सध्याची शेती कामे तसेच स्थानिक पातळीवरील अडचणी लक्षात घेता ही मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
पिक विमा कार्यालयाच्या बाहेर रांगा
नुकसानीनंतर केवळ 72 तासांच्या आतमध्ये शेतकऱ्यांना माहिती भरणे आवश्यक आहे. ‘क्रॅप इंन्शुरन्स’ अॅपची प्रक्रिया ही अवघड असल्याने अनेक शेतकरी पिक विमा कंपनाचे कार्यालय जवळ करीत आहेत. याठिकाणीही शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांची पळापळ, अधिकारी मात्र निर्धास्त
पिक नुकसानीनंतर ऑनलाईन तक्रार नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ऑनलाईनद्वारे तक्रार नोंदीचे प्रमाणही कमी आहे. गुरूवारपासून ऑफलाईनही तक्रार नोंदिवली जात आहे. याकरिता शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या कार्यालयात जावे लागते. परंतु, या कार्यालयात कर्मचारीच हजर नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे.
कृषी विभागानेच केलेले पंचनामे ग्राह्य धरुण मदत मिळावी
ऑनलाईन तक्रार आणि त्यानंतर पंचनामे करण्यासाठी अधिकारी शेतावर येणार ही सर्व प्रक्रीया वेळखाऊ आहे. शेतकरी अडचणीत असल्याने कृषी विभागाने केलेलच पंचनामे ग्राह्य धरुण मदत देण्याची मागणी शेतकरी अमोल तांदळे यांनी केली आहे.
हे पण वाचा: बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा खास स्वादिष्ट पान मोदक; बाप्पासह घरची मंडळीही होतील खुश
हे पण वाचा : विहिरी जवळच बेमुदत उपोषण करणार : भाऊसाहेब प्रकाश आढाव / काय आहे प्रकरण वाचा सविस्तर...
सौजन्य: deilyhunt
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद