नगरसेवक पदाधिकारी उजेडात तर नागरिकांच्या दारात अंधार !

1 minute read
0



पारनेर/प्रतिनिधी: नगर पंचायत पथदिव्यांचा प्रश्न गंभीर झाला असून नागरिकांनी याबाबत नगरपंचायत कार्यालयांमध्ये उपोषण केले आहे. अळकुटी रोड, सिद्धेश्वर वाडी रोड, चेडे मळा, पुणे वाडी फाटा पथदिवे अनेक दिवसापासून नादुरुस्त आहेत या कारणाने नागरिकांनी थेट नगरपंचायत मध्ये दि.७ रोजी पासून उपोषण सुरू केले आहे.



यावेळी नागरिकांनी मागणी केली आहे की जेव्हापासून पारनेर नगरपंचायतीचे अस्तित्वात आली आहे तेव्हापासून जे पथदिवे बसवण्यात आले आहेत ते बंद आहेत यामध्ये अळकुटी रोड, चेडे मळा, सिद्धेश्वर वाडी रोड या ठिकाणी मागील काही दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढले आहे. तसेच हिंस्र प्राण्यांच्या धोका या भागामध्ये आहे.

हे पण वाचा: हरितालिका तृतीया : जाणून घ्या आरती आणि कथा

येथील शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे. लोडशेडिंग असल्याकारणाने रात्री-अपरात्री शेतकऱ्यांना शेतमालाला पाणी भरण्यासाठी जावे लागत आहे. हिंस्त्र प्राण्यांचा त्यांना सामनाही होतो म्हणून सदरील भागातील पथदिवे दुरुस्त करणे गरजेचे आहे, तसेच या भागात चोरीचे प्रमाण अलीकडील काळामध्ये वाढले असून याबाबत अनेक वेळा तोंडी तक्रार करूनही तेथील नगरसेवकांनी दखल घेतली नाही. नगर पंचायत पाणी लाईट बिल सर्वांचे पैसे जनतेकडून घेते मात्र ती जनता अंधारात असेल तर काय असा सवाल उपस्थित केला आहे. त्याचबरोबर गणेश उत्सव जवळ आलेला असताना या भागातील स्टेट लाईट लवकरात लवकर सुरू व्हाव्यात अशी मागणी संबंधित नागरिकांनी केली आहे. नगरपंचायतीने पथदिवे फक्त जनतेच्या उपयोगासाठी बसवले आहेत सध्याची पथदिव्यांची बंद स्थिति पाहता ते चालू करायला व त्याचा खर्च करायला नगरपंचायत कडे निधी नाही. मात्र मोठाले नेते व नगरसेवक यांच्या घराजवळील पथदिवे हे कधीच बंद पडत नाहीत बंद पडले तरी ते वेळोवेळी सुरळीत चालू होतात ही खंत देखील जनतेच्या मनात आहे. सामान्य जनता मात्र अंधारात असताना त्याकडे नगरपंचायत प्रशासनाने लक्ष घालावे यासाठी आमरण उपोषण करत आहे. या आशयाचे पत्र संदीप औटी यांनी पारनेर तहसील कार्यालय पोलीस स्टेशन नगरपंचायत यांना दिले त्यानुसार त्यांनी उपोषण सुरू केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2

To Top