कोरोनामुळे गेली २ वर्षात कोरोना नियमांमुळे हा कीर्तन सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास बंधने होती. शनिवार पासून कीर्तन सोहळ्याला सुरुवात झाली असून सांगता ही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रामयनाचार्य रामराव ढोक महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने होईल. या कीर्तन सोहळ्याचा अहमदनगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील हजारो भाविक लाभ घेत असतात.
यावेळी ह.भ.प. नवनाथ महाराज माशेरे यांनी कन्हैय्या परिवाराच्या वतीने तरुणांना व उपस्थितांना एक मोलाचा संदेश दिला की नोकरी करण्यापेक्षा आयुष्यात नोकरी निर्माण करणारे व्हा. म्हणजे उद्योगपती व्हा. आजच्या तरुणांसाठी ही प्रेरणादायी गोष्ट आहे. आयुष्यभर नोकरी करण्यापेक्षा नोकरी निर्माण करणे आज काळाची गरज आहे.
येणार्या पावसाळ्यामध्ये याची त्याची जिरवा जिरवी करण्यापेक्षा पाणी जिरवा आणि वृक्षारोपण करण्याचा निच्छय आपल्या हातामध्ये घ्या जेणे करून पुन्हा कधी कोरोंनाची लाट या महाराष्ट्रात य देशात आली तर ऑक्सीजन पासून मारणार नाहीत याची खबरदारी आजच्या तरुणांना घ्यावी लागेल. हा संदेश सर्वांसाठी महत्वाचा आहे.
या कीर्तन सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मळगंगा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्टचे संचालक शांताराममामा लंके, मुंबई कुलाबा येथील उद्योजक बबनभाऊ लंके व कन्हैया उद्योग समूहाचे सीइओ मच्छिन्द्र लंके यांनी केले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद