स्व.बाबासाहेब कवाद यांच्या आदर्श विचाराप्रमाणे ग्रामविकासाचे प्रामाणिकपणे कार्य केले- सरपंच ठकाराम लंके

1 minute read
0



निघोज: पारनेर तालुक्यातील निघोज येथील निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सोमवार(दि.२८)रोजी गावचे सरपंच ठकाराम बाळाजी लंके व उपसरपंच  बाबाजी विठोबा लंके यांनी आपला ग्रामपंचायत पदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ यशस्वी पणे पूर्ण केला. सत्कार प्रसंगी सरपंच ठकाराम लंके म्हणाले की, स्वर्गीय बाबासाहेब कवाद यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार मी गावाचा सर्वांच्या सहकार्यांने चांगला विकास घडवून आणला. स्वर्गीय बाबासाहेब कवाद हे आज आपल्यात असते तर अजुन चांगल्या प्रकारे त्यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभले असते. यापुढील काळात आपण सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रात चांगले काम करू असे आश्वासन दिले.
यावेळी सरपंच ठकाराम लंके, उपसरपंच बाबाजी लंके यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन वसंत कवाद, व्हा चेअरमन नामदेव थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.
निघोज(ता.पारनेर)येथिल निघोज नागरी सहकारी पतसंस्थेत सरपंच ठकाराम लंके, उपसरपंच बाबाजी लंके यांचा सत्कार करताना संस्थेचे चेअरमन वसंत कवाद, व्हा चेअरमन नामदेव थोरात समवेत सर्व  संचालक
स्व.बाबासाहेब कवाद यांच्या विचाराप्रमाणे माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात गावात ग्रामविकासाचे आदर्शवत असे नियोजनपूर्वक सुंदर अस कार्य केले,मात्र त्यांचा सहवास आपल्याला फार काळ लाभला नाही,त्यामुळे त्यांची उणिव आजही भासते,त्यांच्या सारखे सहकारातील आदर्श अस व्यक्तीमत्व पुन्हा होणे नाही,स्वतः कमी शिक्षीत असून ही सहकाराच्या माध्यमातून ग्रामिण भागातील जनतेचे अर्थकारण बदलण्यांसाठी संपूर्ण आयुष्य वेचणांरे ग्रामिण भागातील "सहकाररत्न ग्रामभुषण"म्हणजे स्व.बाबासाहेब कवाद - सरपंच ठकाराम लंके

यावेळी संस्थेचे तज्ञ संचालक शांताराम कळसकर यांनी सरपंच,उपसरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावाच्या विकासासाठी केलेल्या चांगल्या कामाची प्रशंसा केली.
या वेळी कन्हैया उदयोग समुहाचे अध्यक्ष शांताराम लंके, निघोज नागरी पतसंस्थेचे संचालक चंद्रकांत लामखडे, बाळासाहेब लामखडे, दामू लंके, भिवाजी रसाळ, बहिरु कळसकर, शांताराम कळसकर, अँड. सुनिल मेसे, निघोज परीसर कृषी फलोदयान संस्थेचे संचालक रामदास वरखडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय लंके, पांडुरंग कृपा पतसंस्थेचे व्हा चेअरमन चंद्रकांत लंके, बन्सी गुंड गुरुजी तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड.बाळासाहेब लामखडे यांनी केले तर आभार रामदास वरखडे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2

To Top