इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडलंय. रस्त्यावर वाहन चालवताना नागरिकांना आता हजार वेळा विचार करावा लागतो. सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे नागरिकांचा कल इलेक्टाॅनिक वाहनांकडे वाढला.., तर काहींनी आपली पेट्रोल-डिझेलवरील वाहने ‘सीएनजी’ इंधनावर करण्यास सुरुवात केली..
सततच्या महागाईने पिचलेल्या वाहनधारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.. महाराष्ट्रात येत्या 1 एप्रिलपासून ‘सीएनजी’ इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. उपमुख्यमंत्री, तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी ‘सीएनजी’वरील करात मोठी कपात करण्याचे सूतोवाच केले होते.
पवार यांनी अर्थसंकल्पात केलेल्या या घोषणेची अंमलबजावणी महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून केली जाणार आहे. मूल्यवर्धित कराचा दर थेट 3 टक्क्यांवर आणला जाणार असल्याने ‘सीएनजी’च्या किंमती कमी होतील. त्यामुळे ‘सीएनजी’वर (CNG) वाहन चालवणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे
महाराष्ट्रात आता ‘सीएनजी’ इंधन मोठ्या प्रमाणात स्वस्त होणार आहे. त्याचा फायदा, विशेषत: ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसह प्रवासी वाहतूक करणारी वाहनांना, तसेच खासगी वाहनधारकांना होणार आहे. या निर्णयाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद