पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त..! ‘या’ राज्यांनीही केली कर कपात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणतात..?

0



वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या अबकारी करात मोठी कपात करण्याचा निर्णय शनिवारी (ता. 21) घेतला होता. केंद्र सरकारने पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटरमागे 8 रुपये, तर डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी केलं. त्याचा परिणाम लगेच आज दिसला..

करात कपात केल्याने पेट्रोल-डिझेल आज स्वस्त झालेय. भारतीय तेल कंपन्यांनी आज (रविवारी) पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले. देशातील सर्वात मोठी ‘ऑइल मार्केटिंग’ कंपनी ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन’च्या नव्या दरानुसार, दिल्लीत पेट्रोल दर 96.72 रुपये प्रति लिटर (Petrol Diesel Prices)झाला, तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर इतका दर होता.

केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी झाल्याने आज पेट्रोल 8.69 रुपये, तर डिझेल 7.5 रुपये स्वस्त झालंय. दरम्यान, मोदी सरकारने करात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यांनाही त्यांचा कर कमी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, राजस्थान, केरळ व ओडिशा या राज्यांनीही इंधनावरील व्हॅट कमी केला. त्यामुळे त्या त्या राज्यात पेट्रोल व डिझेलचे दर आणखी कमी झाले आहेत..

प्रमुख शहरातील आजचे दर

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१११.५८९६.०५
अकोला१११.४२९५.९२
अमरावती१११.८७९६.३५
औरंगाबाद११३.०३९८.९५
भंडारा११२.२०९६.६८
बीड१११.८१९६.२७
बुलढाणा१११.५४९६.०४
चंद्रपूर१११.१६९५.६९
धुळे१११.८०९६.२७
गडचिरोली१११.९६९६.४६
गोंदिया११२.८९९७.३३
हिंगोली११२.०३९६.५१
जळगाव१११.४४९५.९२
जालना११२.९९९७.४०
कोल्हापूर१११.३२९५.८२
लातूर११२.८४९७.२७
मुंबई शहर१११.३५९७.२८
नागपूर१११.४१९५.९२
नांदेड११३.०७९७.५३
नंदुरबार११२.५२९६.९६
नाशिक१११.८३९६.२९
उस्मानाबाद१११.८४९६.३१
पालघर१११.८०९६.२३
परभणी११३.९८९८.३५
पुणे११०.९५९५.४४
रायगड१११.८५९६.२८
रत्नागिरी११२.८५९७. २९
सांगली१११.४६९५.९५
सातारा१११.८७९६.३५
सिंधुदुर्ग११२.९५९७.३९
सोलापूर१११.६७९६.१५
ठाणे१११.४९९७.४२
वर्धा१११.२७९५.७७
वाशिम१११.६२९६.११
यवतमाळ१११.५४९६.०५
दरम्यान, केंद्र सरकारने इंधनावरील करात कपात केल्यानंतर इतर काही राज्यांनीही कर कपात केली. त्यामुळे आता ठाकरे सरकार काय निर्णय घेते, याकडे राज्यातील नागरिकांचे लक्ष लागलेले असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र तसे कोणतेही संकेत दिलेले नाहीत.

मोदी सरकारवर टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, की “आधी भरमसाठ किंमती वाढवायच्या नि नंतर नाममात्र दर कमी केल्याचा आव आणायचा, हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता, 6-7 वर्षांपूर्वी असलेला अबकारी कराइतकी कपात केली, तरच खऱ्या अर्थाने नागरिकांना दिलासा मिळेल. इंधनावरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवा होता..”

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top