सरकारची ई श्रम कार्ड धारकांसाठी नवी ऑफर; आता श्रम कार्डधारकांना मिळणार ‘हे’ नवीन लाभ

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज

केंद्र आणि राज्य सरकार जनतेसाठी नियमित नविनविन योजना राबवित आहेत. तरुण, सुशिक्षित, बेरोजगार यांच्यासाठी नवीन रोजगाराच्या संधी घेऊन सरकार नियमितपणे येते. तसेच केंद्र सरकारची ही ई श्रम कार्ड योजना सुरू करण्यामागे असंघटित वर्गाला आर्थिक बळकटी देणे हा उद्देश आहे.

काय आहे ई श्रम कार्ड :- असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा एक राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयानं ई-श्रम पोर्टल विकसित केलं आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर संबंधित कामगाराला ई-श्रम कार्ड दिलं जाणार आहे.

पात्रता :- देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात. बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजंदारी कामगारांसह, भूमिहीन शेतमजूर व इतर काही असंघटित कामगारांची नोंदणी या संकेतस्थळावर करता येणार आहे.

नोंदणीसाठी वय :- ई-श्रम कार्डसाठी वय 16 वर्षांपेक्षा जास्त आणि 59 वर्षांपर्यंतचा कोणताही कामगार पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतो. या वयामधील कोणतीही व्यक्ती कार्ड बनवू शकते.

इ श्रम कार्डची ऑफर किंवा विशेष योजना पुढीलप्रमाणे :- 
योजनेशी संबंधित लोकांसाठी सरकार ऑफर देत आहे. 500 रुपयांशिवाय नोंदणीकृत लोकांना या योजनेचे अनेक मोठे फायदे मिळत आहेत. ई-श्रम कार्ड असल्यास पीएम सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. एखाद्या कामगाराचा अपघातात मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये मिळतात. त्याचबरोबर त्या व्यक्तीला अपंगत्व असल्यास एक लाख रुपयांची रक्कम उपलब्ध आहे.
तसेच घर बांधण्यासाठी मदत म्हणून या योजनेअंतर्गत पैसे देखील दिले जातील. त्याचबरोबर ई-श्रम कार्डधारकांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांचा थेट लाभही मिळणार आहे. भविष्यात याला रेशन कार्ड लिंक केले जाईल, ज्यामुळे तुम्हाला देशातील कोणत्याही रेशन दुकानातून रेशन मिळू शकेल. याशिवाय सरकारकडून दरमहा 500 ते 1000 रुपये लोकांच्या बँक खात्यात पाठवले जात आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top